मुंबई | अभिनेता आमिर खान आणि किरण राव यांनी आपल्या नात्याला आता विराम देण्याचे ठरविले आहे. दोघांनीही एकमेकांच्या सहमतीने घटस्फोट घेतल्याचे जाहीर केले आहे.
यामुळे त्यांच्या 15 वर्षांच्या संसाराला आता पुर्णविराम मिळणार आहे. एका जॉइंट स्टेटमेंटद्वारे आमिर आणि किरण या दोघांनीही
त्यांच्या घटस्फोटाविषयी माहिती दिली आहे.
आमच्या 15 वर्षाच्या संसारात आम्ही एकत्र अनुभव, आनंद आणि हास्य शेअर केले आहे आणि आमचे नाते हे केवळ विश्वास, सन्मान आणि प्रेमामुळे वृद्धिंगत झाले आहे. आम्हाला आयुष्यात नवीन अध्यायाची सुरुवात करायची आहे. त्यासाठी आता नवरा बायको म्हणून नाही तर सह-पालक आणि एकमेकांचे कुटुंब म्हणून राहू, असे त्यांनी म्हटलं आहे.
या दोघांच्या घटस्फोटाच्या बातमीने अनेक चाहत्यांना आणि त्यांच्या जवळील व्यक्तींना धक्का बसला आहे. मात्र, आमिर खानने, आम्ही दोघे जरी आता पती पत्नीसारखे राहत नसलो तरी आमची मैत्री कायम राहिल, असं सांगितलं आहे.
आमिरचा किरणशी झालेला हा दुसरा विवाह होता. या दोघांनी घटस्फोट नेमका कोणत्या कारणाने घेतला आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे अनेकजण कारण काय असल्याचे जाणून घेण्याच्या तयारीत आहे.
आम्ही आमच्या मुलाचे म्हणजेच आझादचे पालन-पोषण आम्ही एकत्र करू. त्याचबरोबर आम्ही चित्रपट, पानी फाउंडेशन आणि ज्याबद्दल आम्ही भावुक आहोत अशा प्रकल्पांसाठी सहकारी म्हणून काम करत राहू, असंही आमिर खान आणि किरण राव यांनी जॉइंट स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे.
0 Comments