Ticker

6/recent/ticker-posts

अर्णब गोस्वामींच्या अडचणीत पुन्हा वाढ

From Facebook


मुंबई | गेल्या वर्षीपासून वादाच्या भोव-यात अडकलेले रिपब्लिक न्यूजचे मुख्य संपादक असलेले अर्णब गोस्वामी आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. 


टीआरपी घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांकडून गोस्वामी यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या आरोपपत्रात गोस्वामी यांच्यावर विविध आरोप लावण्यात आले असून, या गुन्ह्यात 19 व्या क्रमांकाचा आरोपी म्हणून त्यांचे नाव आहे. 


फसवणूक करणे, कट रचणे आणि आयपीसीच्या इतर कलमांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्णब गोस्वामी यांच्याबरोबरच रिपब्लिक टीव्हीच्या इतर पाच जणांविरुद्ध तर महामुव्हीच्या दोन जणांविरुध्द आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.


पोलिसांकडून याप्रकरणात आजवर 22 जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा टीआरपी घोटाळा मागील वर्षाच्या अखेरीस म्हणजेच ऑक्टोबरमध्ये उघडकीस आला होता.


हंसा रिसर्च ग्रुप (एचआरजी) मार्फत रेटिंग एजन्सी ब्रॉडकास्ट ऑडियंस रिसर्च कौन्सिलने (बीएआरसी) याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. आता पुन्हा एकदा अर्णब गोस्वामी यांना या प्रकरणी चौकशीसाठी केव्हा बोलावलं जाईल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Post a Comment

0 Comments