Ticker

6/recent/ticker-posts

अन्नदात्यासाठी अन्नत्याग’ आंदोलनात हजारो शेतकरी होणार सहभागी !



१९ मार्च रोजी अन्नत्याग आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन ! 
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविले निवेदन ! 

मोर्शी तालुका प्रतिनिधी 
शेतकऱ्यांंविषयी सहवेदना व्यक्त करण्यासोबत त्यांच्या विषयीची बांधिलकी बळकट करण्यासाठी तसेच ज्या धोरणांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, त्या धोरणांचा निषेध करण्यासासाठी मोर्शी व दापोरी येथे १९ मार्च रोजी एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की १९ मार्च १९८६ रोजी यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण गावचे शेतकरी साहेबराव करपे यांनी शेती परवडत नाही म्हणून पत्नी, मुलांसह आत्महत्या केली. ती महाराष्ट्रातील पहिली आत्महत्या होती. त्यानंतर आतापर्यंत चार लाखांपर्यंत शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्या आजही सुरूच आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फुटावी, समाजातील घटकांनासुद्धा याची जाणीव व्हावी, या उद्देशाने समाजातील सर्वच नागरिकांना शेतकऱ्यांप्रती एक दिवस अन्नत्याग उपोषण करावे लागत आहे. 
    अन्नत्याग आंदोलनामध्ये १८ वर्षांवरील सर्वच नागरिकांनी सहभागी व्हावे. समाजप्रबोधन व्हावे, या उद्देशाने रामजिबाबा चौक मोर्शी व दापोरी येथील ग्राम कार्यालयाजवळ सर्वच संघटनांना व सर्वपक्षीयांना घेऊन एक दिवसाचे अन्नत्याग उपोषण करण्यात येणार आहे. आपल्या शेतकरी प्रति संवेदना व्यक्त करण्यासाठी एक दिवसाचा उपवास ठेवून याच्यामध्ये जात, धर्म, पंथ, या कक्षाच्या पलीकडे जाऊन कुठल्याही विषयाला थारा दिल्या गेल्या नाही त्यामुळे या शेतकरी हिताच्या आंदोलनामध्ये सर्वच समाजाने आपला सहभाग नोंदवावा व आपली कृतज्ञता शेतकऱ्या प्रति व्यक्त करावी ज्यांना शक्य असेल त्यांनी शेतकऱ्यांसाठी अन्नत्याग आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी होणार असल्याचे संदीप रोडे, ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके यांनी यावेळी सांगितले. 
      मोर्शी व दापोरी येथे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या निषेधार्थ अन्नत्याग उपोषण आंदोलन करणार असल्याचे निवेदन संदीप रोडे,  ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके यांनी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विभागीय आयुक्त, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांना दिले त्यावेळी संदीप रोडे, रुपेश वाळके, नरेंद्र जिचकार, अंकुश घारड, सुनील केचे, मनीष गुडधे, प्रणय वानखडे, सतीश टिपरे, देवानंद बेले, यांच्यासह आदी मंडळी उपस्थित होती. 

{}

मेक इन महाराष्ट्र, समृद्धी महामार्ग, बुलेट ट्रेन अशा राजकीय घोषणा रोज कानावर पडत असतांना महाराष्ट्रात सरासरी दहा शेतकरी दररोज आत्महत्या करतात. त्याची मात्र चर्चा कुठेच होत नाही. शेतकऱ्यांच्या न बदललेल्या विदारकतेकडे लक्ष वेधण्यासाठी आम्ही १९ मार्च रोजी हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत ‘अन्नदात्यासाठी अन्नत्याग’ हे अभिनव आंदोलन करणार आहे -- रुपेश वाळके ग्राम पंचायत सदस्य. 

अवघा समाज शेतकऱ्यांच्या बाजूने आहे. अन्नत्याग आंदोलनातील सर्वसामान्यांचा सहभाग हे त्याचेच प्रतीक आहे, मात्र शेतकऱ्यांनी हताश होऊन आत्महत्येसारखे पाऊल उचलू नये. त्यामुळे समस्या सुटणार नाही. सरकारनेही मानसिक खच्चीकरण होणार नाही व शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये यासाठी शासनाने शेतकरी विरोधी कायदे रद्द करून उपाय योजना करणे गरजेचे आहे -- संदीप रोडे


Post a Comment

0 Comments