अकोला : न्यु महसुल कॉलनी, खडकी बु. प्रभाग क्र. २० मधील लोकवस्तीतील सरकारी विहीरतील गाळ काढून त्या विहीरीवर जिवीत हाणी होऊ नये म्हणून लोखंडी जाळी बसवणे तसेच ‘आरो प्लँट’ (पे अॅण्ड अर्न वॉटर) बसविल्यास या प्रभागातील पाण्याची समस्या मार्गी लागू शकते या आशयाचे निवेदन अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री अॅड. आकाश फुंडकर यांना त्यांचे पिए योगेश खांदवे यांचे मार्फत निवेदन दिले.
हद्दवाढ भागामध्ये पाण्याची प्रचंड समस्या आहे, जूनी पाईप लाईन असल्याने नळाला पाणी येत नाही. तसेच या सरकारी विहीरीची साफसफाई गेल्या १५ ते २० वर्षापासून केली नसल्याने विहीरीत गाळ साचलेला आहे, चुकून कोणी विहरीत पडल्यास काळात फसून जिवीत होणी होऊ शकते तसेच सदरहू विहीरीचे पाणी गोड असल्याने या विहीरीतील गाळ काढल्यास या प्रभागातील जनतेची पाण्याची समस्या मार्गी लागण्यास मदत होईल.
लोकवस्तीतील मोठी ‘बारव विहीर असल्याने लहान बालके आजूबाजूला खेळतात त्यामुळे विहीरीत पडून मोठी जिवीत हाणी होऊ शकते म्हणून या विहीरीवर लोखंडी जाळी बसवण्यात यावी व होणारी जिवीत हाणी टाळावी याकरीता लोकवस्तीतील ३० नागरिकांच्या सह्याचे निवेदन देण्यात आले. यापुर्वी महाननगर पालिका यांने निवेदन दिले परंतू कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. निवेदन देतेवेळी पत्रकार पंजाबराव वर, सुभाष वानखडे, रत्नाकर भुजाडे, पत्रकार दिपक शिरसाट, प्रकाश जंजाळ, अॅड. प्रजानंद उपर्वट, सामाजिक कार्यकर्ता मंगेश झिने आदींची उपस्थिती होती.
0 Comments