Ticker

6/recent/ticker-posts

नवरदेवाच्या मित्रांनीच आणले लग्नात विघ्न; नवरी न घेताच परतावे लागले

From Pixabay


अहमदनगर | लग्न म्हणजे दोन कुटूंबाचे, दोन जीवांचे मिलन. परंतू अनेकदा काही कारणांनी विवाहात अडचणी येऊन जुळलेले लग्न तुटण्याच्या वाटेवर येते. बरेचदा तर ऐन लग्नमंडपात विवाह तुटण्याच्या अनेक घटना घडतांना दिसून येतात. 


अशीच एक घटना अहमदनगर येथील काष्टी येथे शुक्रवारी घडली आहे. या घटनेने सर्वांना हैराण करुन सोडले आहे. यात चक्क नवरदेवांच्या मित्रांमुळेच नवरदेवावर नवरीविना वरात नेण्याची वेळ आली आहे. 


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्याच्या दृष्टीने शासनाकडून कोरोना नियम आखून देण्यात आले आहे. त्यामुळे अहमदनगर येथील एका तरुणाचा साखरपुडा आणि लग्नाचे सर्व तसेच विधी एकाच दिवशी ठेवण्यात आले होते.


यावेळी साखरपुडा झाल्यानंतर, असे काही घडले की ज्यामुळे मंडपात एकच गोंधळ उडाला. साखरपुडा झाल्यानंतर, लग्न बंधनात अडकणा-या नवरदेव आणि नवरीसाठी हळदीची तयारी सुरु असतांना, नवरीने नवरदेवाचे मित्र चांगले नसल्याचे कारण सांगून लग्नास नकार दिला.


नवरीचा निर्णय ऐकून मांडवात उपस्थित असलेले सर्व नातेवाईक, पाहूणे चकीत झाले. अनेकांनी नवरीला समजवण्याचा देखील प्रयत्न केला. मात्र नवरी तिच्या निर्णयावर ठाम होती.


अखेर नवरदेवाला नवरी न नेताच घरी परतावे लागले. या वधू-वरांनी एकमेकांना पसंत केल्यानंतरच दोन्ही कुटुंबीयांच्या सहमतीने काष्टी येथे एका आलिशान हॉटेलमध्ये दोघांच्या लग्नाचे आयोजन करण्यात आले होते. 


मात्र, वराचे मित्र चांगले नाहीत असं कारण देत वधूने चक्क लग्न मोडल्याने आणि सुखा दुःखात साथ देणारे मित्र तरुणासाठी विघ्न ठरले.

Post a Comment

0 Comments