Ticker

6/recent/ticker-posts

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची पोलिस भरतीबाबत मोठी घोषणा



मुंबई | औरंगाबाद पोलीस परिक्षेत्रांतर्गत कायदा व सुव्यवस्था अंमलबजावणीबाबत झालेल्या आढावा बैठकीत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी एक अत्यंत महत्त्वाची घोषणा केली आहे. 


त्यानुसार डिसेंबर 2021 पर्यंत राज्यात सुमारे 5 हजार पोलिसांची भरती करण्यात येईल. त्यानंतरच्या टप्प्यात सुमारे 7 हजार पोलिसांची भरती करण्यात येईल, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. 


तर पोलीस सेवेत कर्मचारी दाखल झाल्यानंतर संबंधित कर्मचारी किमान पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवानिवृत्त व्हावा, यासाठीच्या योजना आखण्यात येत असल्याचेही ते यावेळी बोलतांना म्हणाले.


एमपीएससीचा कारभार हा अधिक गतिमान होऊन उमेदवारांना न्याय मिळावा, यासाठी एमपीएससी सदस्यांच्या सर्व जागा 31 जुलै अखेरपर्यंत भरणार असल्याचे अजित पवारांनी सांगितले होते. 


तर सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, पोलीस आदी महत्त्वाच्या विभागांमध्ये सर्व पदांची भरती प्रक्रिया वेगाने सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली होती. त्यानंतर आता गृहमंत्र्यांकडून ही मोठी घोषणा करण्यात आली आहे.


https://fb.watch/v/1g-4scoNg/

Post a Comment

0 Comments